Sunday, February 3, 2008

चादंण्यां ...

तुला कधी जाणवलय? चादंण्यांचा प्रकाश शुभ्र पाढंरा असतो ते? जरा आठव, तू शेवटचे कधी बघितले होते रात्रीचे सावळे आकाश? सूर्य जर सत्य असेल चिरंतन असेल तर चादंण्यां सुख आहेत, अल्हदादायी शीतल आहेत. पहतेची गोड स्वप्ने आहेत... हवी-हविशी वाटणारी !! चादंण्यां तुला कुणाची आठवण करून देतात? दूर दूर गेलेल्या आपल्याच मित्रांची, स्वकियांची... पत्राच्या शेवटी "फ़क्त तुझाच" असे लिहिनारया एखाद्याची? अगणित चादंण्यां असोत पण प्रत्येक असते वेगवेगळी... एकदा का त्यांची अणि आपली ओळख जमली, सवय झाली त्यांच्या सहवासाची, की चादंण्यांशिवाय आकाश ही कल्पनाही करवत नाही. एखादी चादंणी थोडी जास्त चमचमते, दूसरी लुकलुकते ... पण त्यांच्याकडून आलेली वारयाची एक झुलुक ... तेवढेच प्रेम, शीतलता घेउन आलेली असते. दूर कुठे तरी चमचमनारया चादंण्यां माला आठवण करून देतात माझ्या मागे राहून गेलेल्या आयुष्याची.... जगाने जगण्याच्या बदल्यात ठेउन घेतलेल्या माझ्या काही क्षणांची... तिथे मागे जाणे भलेहि शक्य नसेल आता... पण माझ्या मागे वळुन बघण्याला ते थांबवू शकेल काय? जेंव्हा मी परत एकदा त्या क्षणांकडे बघतो, मला खुप छान वाटते अगदी चादंण्यां कडे बघताना वाटते तसेच !

-Nile

No comments: